देहरे गटाच्या विकासासाठी आक्रमक महिला नेतृत्व मैदानात – ऋतुजा जालिंदर कदम यांचा ठोस विकास आराखडा

देहरे गटाच्या विकासासाठी आक्रमक महिला नेतृत्व मैदानात – ऋतुजा जालिंदर कदम यांचा ठोस विकास आराखडा
देहरे जिल्हा परिषद गटातील रखडलेला विकास, दुर्लक्षित प्रश्न आणि अपूर्ण आश्वासनांना आता पूर्णविराम देण्यासाठी आक्रमक, अभ्यासू आणि धाडसी महिला नेतृत्व म्हणून कु. ऋतुजा जालिंदर कदम पुढे आल्या आहेत. केवळ घोषणा न करता, देहरे गटातील प्रत्येक गावाचा सविस्तर विकास आराखडा तयार करून त्यांनी आपल्या कामाची दिशा स्पष्ट केली आहे.
“महिला नेतृत्व म्हणजे केवळ प्रतिनिधित्व नाही, तर निर्णयक्षम आणि परिणामकारक कारभार,” हे दाखवून देत ऋतुजा कदम यांनी गावोगावी जाऊन थेट नागरिकांशी संवाद साधला आहे. पाणीटंचाई, खराब रस्ते, अपुऱ्या आरोग्य सुविधा, शिक्षणाचा अभाव, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि युवकांचा रोजगार या मुद्द्यांवर त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे.
देहरे गटात आजवर विकासाच्या नावावर केवळ आश्वासनांची पोकळी राहिली. मात्र आता नियोजन, अभ्यास आणि कृतीचा नवा अध्याय सुरू झाला आहे, असा ठाम विश्वास ऋतुजा कदम यांनी व्यक्त केला. विकास आराखड्यात पाणीपुरवठा योजना, अंतर्गत रस्ते, आरोग्य केंद्रे, शाळा-अंगणवाडी सुधारणा, महिला बचत गटांना बळकटी, शेतकऱ्यांसाठी सिंचन सुविधा आणि युवकांसाठी रोजगारनिर्मिती या बाबींचा समावेश आहे.
विशेष म्हणजे या विकास आराखड्याची मांडणी कागदावर नव्हे, तर थेट जनतेच्या अपेक्षांवर आधारित आहे. महिला, शेतकरी, युवक आणि ज्येष्ठ नागरिक यांचे प्रश्न ऐकून घेऊन त्यावर उपाययोजना सुचवण्यात आल्या आहेत. त्यामुळे देहरे गटातील नागरिकांमध्ये “आता बदल निश्चित आहे” अशी भावना बळावत आहे.
“महिलांना संधी मिळाली तर त्या विकास घडवून आणतात” हे सिद्ध करण्यासाठी ऋतुजा जालिंदर कदम यांनी आक्रमक तयारी केली असून, देहरे गटात सक्षम महिला नेतृत्वाचा नवा इतिहास घडणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
देहरे गटाला आदर्श बनवण्यासाठी संघर्ष, अभ्यास आणि धाडसी निर्णय घेणारे महिला नेतृत्वच आवश्यक असून, ते नेतृत्व आता उभे ठाकल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *