आहिल्यानगर –
येणाऱ्या जिल्हा परीषद, पंचायत समिती महापालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या ताब्यात येणार आहे. असे प्रतिपादन शिवसेना उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांनी केले.
भातोडी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी उबाठा ठाकरे गटाचे सुनिता विक्रम गायकवाड यांची निवड झाल्याबद्दल शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा.शशिकांत गाडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी गाडे म्हणाले नगर तालुक्यात आज ही महाविकास आघाडी चे वर्चस्व आहे. लोकसभ विधानसभा निवडणुकीत भाजप ने सत्ता मिळवली असली तर जिल्हापरिषद, पंचायत समिती महानगर पालिकेवर महाविकास आघाडी च्या ताब्यात येणार. यावेळी गायकवाड म्हणाले शासनाच्या सर्व योजनेचा लाभ सर्व घटकापर्यत पोहचविल्या जातील त्याचा लाभ मिळून दिला जाईल.यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य शरद झोडगे, नगरसेवक योगीराज गाडे, शिवसेना तालुका प्रमुख राजेंद्र भगत,विक्रम गायकवाड, निसार शेख उपतालुकाप्रमुख शिवसेना, उपसरपंच राजू पटेल, कैलास गांगर्डे,अजिनाथ शिंदे, युनूस पटेल,जालिंदर लबडे, शाकीरभाई मुलानी, सुभाष कचरे, रियाज भाई शेख, घनश्याम लबडे, भाऊसाहेब धलपे, शामराव लबडे, किरण खराडे, अशोक तरटे,ज्ञानेश्वर घोलप, अशोक घोलप, शरद पवार, फिरोज पटेल, अमोल कदम उपस्थित होते.